पुणे, २५ जुलै २०२४ : जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेतील असमन्वयामुळेच पुणे शहरात पूरस्थिती निर्माण झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केला. शहरातील पूरस्थितीचा पाहणी करण्यासाठी मोहोळ हे रात्री दिल्लीतून पुण्यात दाखल झाले त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला.
मोहोळ म्हणाले, ‘जलसंपदा विभागाने आधी ३५ हजार नंतर चाळीस हजार आणि पहाटे ५५ हजार क्युसेस पाणी धरणातून सोडले. पण याची माहिती महापालिकेला दिली नाही या सर्व प्रकाराची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल.
अनेक वर्षानंतर असा मोठा पाऊस झाला आहे. असा मोठा पाऊस झाला तरच धरणातून विसर्ग केल्यानंतर पुणे शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होत होती
४० हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग केल्यानंतर अशी पूरस्थिती निर्माण होत नव्हती. पण आज पहाटे अगदी ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करावा लागल्याने पुण्यात हाहाकार झाला. त्यामुळं मी अधिवेशन सोडून आलो. ही माझी जबाबदारी आहे. सकाळ पासून मी आढावा घेतलाय, उद्या परत मी जिल्हाधिकारी आणि पालिलेकडून पुन्हा माहिती घेतली जाईल.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार