पुणे, ८ जानेवारी २०२२ : सुप्रसिद्ध गझल गायक हरिहरन आणि ज्येष्ठ गायक उस्ताद राशिद खान यांच्या जुगलबंदीने १४ व्या स्वर झंकार महोत्सवाचा समारोप झाला. पुणेकर रसिकांना प्रथमच जी जुगलबंदी अनुभवायला मिळाली.
त्यांनी मिश्र खमाज रागाने सादरीकरणाची सुरूवात केली. त्यामध्ये ‘बाली उमर लढखैया अब न छेडो न सैया…’ ही केहेरवा तालातील रचना, अध्दा तीनतालामध्ये उस्ताद गुलाम खाँ यांची रचना ‘ सुंदर बलमा मन भावे… ‘ ही बंदिश त्यांनी सादर केली. खास रसिकांच्या आग्रहास्तव ‘याद पिया की आये…’ ही ठुमरी आणि आओगे जब तुम साजना…, हे लोकप्रिय गीत त्यांनी सादर केले. शास्त्रीय संगीत व उपशास्त्रीय संगीत प्रकारातील ‘तू ही रे…’ या गीताच्या एकत्रित सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांना अजय जोगळेकर( संवादिनी), संजय दास ( गिटार), मुराद अली खान (सारंगी), ओजस अधिया (तबला), अतुल राणींगा (कीबोर्ड), कृष्णा बोंगाणे, अरमान खान, नागेश आडगावकर (तानपुरा आणि स्वर साथ) केली.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा