पुणे, २० मे २०२५:अधिवास पुनर्स्थापना आणि वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, महाराष्ट्र वन विभागाच्या पुणे व सोलापूर विभागांनी दि ग्रासलँड्स ट्रस्ट या संस्थेशी सामंजस्य करार (MoU) केला आहे. या भागीदारीचा उद्देश अभयारण्यांच्या सीमांपलीकडील क्षेत्रांमध्ये अधिवास पुनर्स्थापनेच्या व्यापक उपक्रमांची अंमलबजावणी करणे आणि वन्यजीव संवर्धनासाठी उपाययोजना करणे हा आहे.
हा MoU श्री तुषार चव्हाण (भा.व.से.), उपवनसंरक्षक आणि दि ग्रासलँड्स ट्रस्ट चे संस्थापक श्री. मिहीर गोडबोले यांच्या हस्ते स्वाक्षरी करून करण्यात आला. या वेळी सहाय्यक वनसंरक्षक श्री. मंगेश टाटे, श्री. अतुल जैनक, श्री. दीपक पवार तसेच दि ग्रासलँड्स ट्रस्टचे श्री. निशांत देशपांडे यांची उपस्थिती होती.
“महाराष्ट्रातील गवताळ अधिवासाचे पुनरुज्जीवन, वन्यजीवांचा अधिवास संरक्षित करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे ही वन विभागाची वचनबद्धता आहे,”
असे उपवनसंरक्षक श्री. तुषार चव्हाण (भा.व.से.) यांनी सांगितले, ज्यांनी या भागातील वन्यजीव संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
दि ग्रासलँड्स ट्रस्टचे श्री. मिहीर गोडबोले म्हणाले, “संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीवांचे संरक्षण करणे व गवताळ प्रदेश पुनर्स्थापनेचे एक पुनरुत्पादनीय मॉडेल निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे, जे जैवविविधतेच्या संवर्धनाबरोबरच स्थानिक समुदायांसाठी शाश्वत उपजीविकेची संधी देखील निर्माण करेल.”

 
                                                                             
                                                                             
                                                                             
                                                                             
                                                                             
                 
                                         
                                         
                                         
                                        
More Stories
Pune: तबलावादन आणि गायनाने युवा तालचक्र महोत्सवाला सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन
‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’च्या बोधचिन्हाचे आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण