May 3, 2024

मणिपूर मधील हिंसाचाराविरोधात पुण्यात आपचे आंदोलन

पुणे, २१ जुलै २०२३: गेल्या दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून मणिपुर मध्ये हिंसाचार होत असताना त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपने दुर्लक्ष केलेले आहे. महिलांची विवस्त्र थींड काढून त्यांची विटंबना केली आहे. तरीदेखील केंद्र सरकारकडून कोणतेही कडक पावले चालले जात नाही या विरोधात आम आदमी पक्षातर्फे पुन्हा शहरात जोरात गुरुवारी निदर्शने करण्यात आली.

मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकला नाही आहे, आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरता आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, भाजपाने देशात डर का मोहोल असे वातावरण तयार केले आहे, आज देश्यात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाहीं, अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.

मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात निदर्शने केली आहेत, पुण्यामध्ये आम आदमी पार्टी ने भाजपा वर जोरदार हल्लाबोल केला,त्यानंतर संतप्त कार्यकर्त्याने भाजपा कार्यालय कडे कूच केली. केंद्रातील भाजपा सरकारने लवकरच मनिपुरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम् आदमी पार्टीने केली आहे.