May 14, 2025

सैफ अली खान सारखा अभिनेता जर सुरक्षित राहत नसेल तर गावाखेडातील लोकांचं काय – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे

पुणे, २७/०१/२०२५: अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी जो आरोपी पकडण्यात आलं आहे तो मुख्य आरोपी नसल्याचं सांगितल जात आहे तसेच त्या आरोपीचं आत्ता लग्न मोडल असून त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आलं आहे.याबाबत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की पाहिलं ज्या संशयितांच रेखाटन प्रसिद्ध करण्यात आलं आहे आणि त्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून ती व्यक्ती मुळात हल्लेखोर नाही. पोलिसांनी स्वतःचा नाकारतेपणा लपविण्यासाठी तसेच आपल्याला हल्लेखोर सापडत नाही म्हणून दुसऱ्याच्या नावे बिल फा केलेलं उद्योग आहे.याबाबत अनेकांनी आक्षेप घेतल आहे.मुंबई पोलीस हे देशात तसेच राज्यात अग्रेसर आहे.सैफ अली खान सारखा अभिनेता जर सुरक्षित राहत नसेल तर गावाखेडातील लोकांचं काय अस यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

पुण्यात आज शिवसेना शहर तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या देखील उपस्थित होत्या.यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात या वेळी सुषमा आंधारे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजने संर्दभात कॅगने अहवाल दिला आहे. ही योजना २०३० पंर्यत सुरु ठेवल्यास ,२.७५ लाख केटींचं कर्ज राज्यावर पडेल. त्यामुळं फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हे सरकारकडून ही योजना सुरु ठेवण्यात आली आहे. धोरणात्मक निर्णय आणि लोकप्रिय निर्णय यातील काय निवडावे तर, धोरणात्मक निर्णय निवडावेत. कारण ते दुरगामी परिणाम करतात. हे सरकार मात्र लोकप्रिय निर्णयांच्या मागे आहे अशी टीका यावेळी सुषमा अंधारे यांनी केली.

यावेळी वाल्मीक कराड यांच्याबाबत सुषमा अंधारे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की सुरेश धस आणि अंजली दमानिया चांगले काम करत आहेत. त्याचं त्या बाबत अभिनंदन पण त्यांनी फक्त स्टेजवरुन आरोप न करता ती माहीती ॲफीडेव्हीटवर पोलीसांना तसेच न्यायालयाला द्यावी. आणि जर त्यांनी अशी माहीती दिली असली तर फडणवीस वाल्मिक कराडला वाचवतायेत असे म्हणावे लागेल. ⁠बीड आणि विशेषतः परळीतील गुंडागिरी मोडुन काढायाची असेल तर पोलीसांचे सिंडीकेट उद्धस्त करायाला हवे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी हे काम करायला हवे त्याला धनंजय मुंडे यांनी विरोध करु नये.पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची बदली करा तसेच मला उदय सामंत यांना या राज्याचा उपमुख्यमंत्री होण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. ते उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत.

त्यांची ही इच्छा लपुन राहीली नाही
त्याआधी उदय सामंत म्हणत होते एव्हढे खासदार येणार, एवढे आमदार येणार त्याचे काय झाले हे त्यांनी सांगावे.अस यावेळी अंधारे म्हणाल्या.

तसेच मंत्री प्रतापसरनाईक यांच्याबाबत अंधारे म्हणाल्या की प्रताप सरनाईक यांनी स्वतः चा ताटात काय वाढून ठेवले आहे ते पहावे. स्वतः च्या खात्यात काय होतंय ते पहा साला तुमच्या खात्यात तिकीट दर वाढवल्याचं तुम्हाला कळत नाही, एसटी खरेदी केल्याचं कळत नाही, तुमच्या खात्यात काय निर्णय घेतलेत तुम्हाला कळत नाही.तुमच्या ताटात काय गाढव वाढलंय ते पहा.अशी जोरदार टीका यावेळी अंधारे यांनी केली.