May 14, 2025

जे दाभोळकर,पानसरे,गौरी लंकेश यांचं झालं ते संतोष देशमुख आणि सोमनाथ यांच्या बाबतीत होऊ नये: खासदार सुप्रिया सुळे

पुणे, ३१/०१/२०२५: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना काल मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.आत्ता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.त्या म्हणाल्या की काल गोविंद पानसरे यांच्या हत्या करणाऱ्या लोकांना बेल मिळाली आहे आणि त्याचा कारण असं सांगण्यात येत आहे की एव्हिडन्स नाहीये. माझं म्हणणं आहे मग सरकार काय करत आहे. पोलीस यंत्रणा काय करत आहे.

कॉम्रेड पानसऱ्यांची हत्या,दाभोळकरांची हत्या त्यानंतर सोमनाथ ची हत्या आणि संतोष देशमुख ची हत्या या सगळ्या हत्यांमध्ये एक गोष्ट सातत्याने कॉमन दिसत आहे की कुठल्याही कुटुंबाला न्याय मिळत नाहीये. कॉम्रेड पानसरे यांचे कुटुंबीय पुढे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही ताकतीने माणुसकीच्या नात्याने लढू पण जे दाभोळकर,पानसरे गौरी लंकेश यांच्या बाबतीत झालं ते संतोष आणि सोमनाथ यांच्या बाबतीत होऊ नये.तारीख पे तारीख पडती रहेगी आणि ज्यांनी अशा क्रूर हत्या केलेल्या आहे लोकांची आयुष्य उध्वस्त केले आहेत त्यांना असं वाटेल की आपण जर सरकारच्या बाजूने असू तर आपल्याला काही होणार नाही हे चुकीचं असल्याचं यावेळी सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नांदेड गाव येथील ज्या विहिरी पासून जीबीएस या रुग्णांचा पहीलाव झाल्याचा आरोप होत आहे तिथं भेट देत पाहणी केली.यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे जीबीएसबाबत म्हणाल्या की खडकवासला भागात नांदेड गावात येऊन आज माहिती घेतली आहे.गेले अनेक दिवस मनपा सोबत आम्ही फॉलो करत आहे पुढे काय जाऊन करायच आहे वैज्ञानिक काय कारण आहे हे तातडीने कस कमी करायच तसेच मी मनपा मध्ये झालेल्या मीटिंगमध्ये पाण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे.अनेक भागात एसटीपी प्लांट झाले आहेत लोकसंख्या या भागात वाढत आहे पण अस असताना देखील यात सरकार अपयश ठरत आहे.

प्रदूषणामुळे रोगराई वाढत चालली आहे करोडो रुपये सरकार पाठवतो मात्र त्यातल्या अनेक पैसे ॲडव्हायझरला दिले जातात. दहा वर्षात खरंच पुणे किती स्मार्ट झाला आहे ते पहावे लागेल. किती समस्या वाढल्या आहे मग प्रशासन का कमी पडत आहे.गोखले इन्स्टिट्यूट कडून सरकारला रिपोर्ट दिला पाहिजे आणि यात सरकारने फार गांभीर्याने घेतले पाहिजे.आम्ही यात सरकारला मदत करायला तयार आहे त्यामुळे सरकारने लोकांना वेटिंस धरू नये सरकारने एकच हॉस्पिटल का करावा?सर्व ठिकाणी उपचार झाले पाहिजेत.हे सरकार दादागिरी आणि खंडणी करण्यासाठी आले की नागरिकांच्या सेवेसाठी आले आहे.आम्ही पाणीपट्टी वाढू देणार नाही त्याविरोधात आंदोलन करू अस यावेळी सुळे म्हणाल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये सज्जड दम देत विकासाच्या मधी आलास तर मोकका लावणार असल्याचं सांगितल आहे.याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की माझे काही प्रश्न सरकारला आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेले ५१ दिवस झाले अजूनही एक खुनी फरार आहे.तो अजूनही सापडलेला नाही.तसेच बीडमध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे झालेले आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे दाखविण्यात देखील आले आहे आणि याची कबुली आत्ता जे जे शेतीमंत्री आहेत कोकाटे यांनी दिली असून आधीच्या शेतीमंत्र्यांकडून झालेला हा घोटाळा आहे अस त्यांनी सांगितल आहे म्हणून राज्यात कुठे कुठे हा घोटाळा झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे की पाठवलेली आहे याचा पुढे काय झालं याचे उत्तर सरकारला दिले पाहिजे आणि जे बीड संदर्भात आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया यांनी डीसीएमना दिली आणि डीसीएम नी ते मुख्यमंत्र्यांना दिलेत आता मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतील त्याची वाट मी बघत आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतली.

तसेच 51 दिवस फरार असलेली व्यक्ती अशी कुठे गायब होऊ शकते पोलीस यंत्रणा काय करते आणि जोपर्यंत बीड आणि परभणी सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्त बसणार नाही.अस यावेळी सुळे म्हणाल्या.तसेच उद्या भाजप आणि शिंदे यांच्या खासदारांची दिल्लीत भेट घेणार आहे आणि सगळ्या बाजूला ठेवून एकत्र सर्वांनी लढलं पाहिजे आणि याबाबत अमित शहा याची भेट देखील घेणार असल्याचं यावेळी सुळे म्हणाल्या.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बाबत सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की नैतिकतेवर आधारावर राजनामा दिला पाहिजे.आम्ही सगळे अंजली दमानिया बजरंग सोनवणे बीड मधील सर्व आमदार पहिल्या दिवसांपासून हो मागणी करत आहोत पण का राजीनामा दिला जात नाही अस यावेळी सुळे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजनेचा लाभ परदेशी महिलांना मिळालं असल्याचं समोर आलं आहे.याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की सरकारी एजन्सीनेच लाडकी बहिणींचे फॉर्म भरून घेतले तर सरकारने यावर उत्तर दिलं पाहिजे.या महिन्यापासून २१०० रुपये येणार होते का आले नाहीत अजून फक्त सर्वांकडून राखी बांधून घेतली आत्ता हे परत घेण्यासाठी तुम्ही सगळं केलं का असा सवाल या वेळी सुळे यांनी केला.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तब्येतीबाबत सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या कीउद्यापासून शरद पवार कार्यक्रमांमध्ये जाणार आहे तसेच ते सक्रिय होणार आहे. तसेच काल कुंभमेळा येथे जी घटना घडली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे.भाजप खासदार निरंजन जी यांनी जे काही काल सांगितल आहे की कुंभमेळामध्ये आर्मी लावा अस ग्राउंड वरून भाजपच्या खासदारांनी म्हटल आहे तर उत्तर प्रदेश सरकारने यात काळजी घेतली पाहिजे.त्या ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे त्यांचे प्रशासन काम व्यवस्थित करत नाही असं दिसत आहे.तसेच सगळं चांगलं सुरू आहे असं कोणी म्हणत असेल तर दुर्दैव आहे अस यावेळी सुळे म्हणाल्या.