मुंबई, ७ जानेवारी २०२५ ः पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मजा नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची आल्हाट, पल्लवी जावळे, संगीता ठोसर या ५ नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. शिवसेना उबाठाचे पुण्यात १० नगरसेवक होते, त्यापैकी ५ जण निवडणुकीच्या आधीच भाजपच्या गळाला लागले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, संघटन पर्व प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण, सुनील कांबळे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, बाबा मिसाळ आदी उपस्थित होते. हिंदुत्वाच्या विचारासाठी भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या या सर्वांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे म्हणले, पुण्यातील हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वपूर्ण आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडला. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देणे पसंत नव्हते. म्हणूनच अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामान्य कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडून जात आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्यामुळे शिवसेनेत अनेकांची घुसमट होत होती. या घुसमटीमुळेच या पाच नगरसेवकांनी उबाठा ची साथ सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, या प्रवेशामुळे पुण्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. या पक्ष प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होणार आहे. संघटन पर्व प्रभारी आ. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपामध्ये आलेल्या सर्वांचा योग्य तो मान राखला जाईल.
यावेळी पुणए कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठाचे विभाग प्रमुख संतोष सोनवणे, उपविभाग प्रमुख नीलेश कुलकर्णी, अमोल रासकर, हरी राठोड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार