कोंढवा, २५ एप्रिल २०२५ः जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांनी आपला जीव गमावला, ज्यात पुण्यातील दोघांचा ही समावेश होता. या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्त पुण्यातील कोंढवा भागातील कोणार्क मॉल येथे जमीयेते उलेमा-ए-हींदच्या वतीने ‘आतंकवादी मुर्दाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा जोरदार घोषणाबाजी करत आंदलोन करण्यात आले. तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात जमियेते उलेमा ए हींदचे अध्यक्ष कारी इद्रिस यांनी भविष्यात अशी घटना परत होऊ नये यासाठी सरकारने दहशतवाद्यांना फाशी द्यावी अशी मागणी केली. तसेच ते म्हणाले, “या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करत असून आमच्या धर्मात अशा प्रकराच्या गोष्टी कधीच मान्य नाहीत. आमचा धर्म सांगतो, की एकाद्या व्यक्तीला मारणे, म्हणजेच मानवतेला नष्ट करणे आणि मुस्लीम धर्म असे शिक्षण देत नाही. अशा प्रकारारे हल्ला करत निर्दोषांना मारणारे दहशतवादी कधीच मुसलमान होऊ शकत नाहीत. देशात आधिच धर्मावरून अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्याचा उद्देश देखील देशातील दोन गटांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रकार.
आमचा सरकारला प्रश्न आहे की, अशा प्रकारे हे देशातवादी भारतात प्रवेशच कसे करू शकतात? त्या भागातील सुरक्षा व्यवस्थेचे काय ?. तसेच ज्या कुटुंबीयाने आपल्या घरातील व्यक्तीला या हल्ल्यात गमावले आहे, त्यांना सरकारने सर्वप्रकारे मदत करावी अशी आमची मागणी असल्याचे ही इद्रिस यांनी नमूद केले.
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार