May 14, 2025

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुण्यात भगदाड पडणार

पुणे, ३१ डिसेंबर २०२४ : पुणे महापालिकेसह राज्यातील अन्य महापालिकांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना आता पक्ष बदलण्याचा ट्रेड सुरू होत आहे. पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे भगदाड पडणार असून पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे.

पुढील काही महिन्यांमध्ये मिनी विधानसभा असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राज्यात पार पडणार आहे. यामध्ये राज्यातील २९ महापालिकांसह जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकांचा समावेश आहे. पुणे महापालिकेत २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये भाजपची सत्ता होती भाजपच्या शहरात ११ नगरसेवक असताना शिवसेनेचे केवळ दहा नगरसेवक निवडून आलेले होते. २०२२ पासून पुणे महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पुणे शहरातील पक्षाकडे उद्धव ठाकरेंनी व अन्य नेत्यांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे येथील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे फक्त वीस आमदार निवडून आलेले आहेत. त्यातही पुणे शहर आपल्या एकाही आमदाराचा समावेश नाही. पक्ष संघटने कडे ठाकरे गटाकडून प्रचंड दुर्लक्ष केले जात असल्याने पक्षाला गळती सुरू झालेली आहे.

त्यामुळेच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत.
यामध्ये माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या पाच जणांचा समावेश आहे. अन्य नगरसेवक ही लवकरच प्रवेशाचा निर्णय घेतील असे देखील सांगितले जात आहे. शिवसेनेचे नगरसेवक भाजपमध्ये यावेत यासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री यांनी देखील प्रयत्न केले असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेतल्या गटबाजीमुळे घेतला निर्णय

ठाकरे गटामध्ये प्रचंड गडबाजी निर्माण झाली आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये एक वाक्यता नाही तसेच संघटनेकडे कोणीही लक्ष देत नाही. मनसे मधून वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेले नंतर ठाकरे गटात आलेल्या वसंत मोरे यांना पक्षाने राज्याचे संघटक पद दिलेले आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तीला एवढे मोठे पद दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झालेली आहे. अनेक वर्ष आम्ही पक्षासाठी काम केले तरीही अन्य नेत्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागत असेल तर आम्ही पक्षात राहून काय करू? असा प्रश्न या माजी नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे.