मुंबई, २३ एप्रिल २०२५ – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या श्रीनगरहून दोन विशेष विमान मुंबईकडे येणार असून, या विमानांमधून १८२ पर्यटकांची वाहतूक केली जाणार आहे.
ही माहिती केंद्रीय राज्य मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली असून, पर्यटकांना मोफत प्रवासाची सुविधा पुरवली जाणार आहे. या दोन विशेष विमानांची व्यवस्था इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांमार्फत करण्यात आली आहे.
मोहोळ यांनी स्पष्ट केलं की, या दोन्ही विमानांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे, जेणेकरून पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोणताही आर्थिक भार पडू नये.
राज्य सरकारच्या या तातडीच्या निर्णयामुळे अडकलेल्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला असून, श्रीनगर ते मुंबई या प्रवासासाठीची सर्व व्यवस्था आता अंतिम टप्प्यात आहे.
सूचना: अधिक माहितीसाठी संबंधित स्थानिक प्रशासन किंवा महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क साधावा.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पावसामुळे हैराण धानोरी, वडगावशेरी, खराडी परिसर; आमदार बापूसाहेब पठारे यांची अधिवेशनात ठोस उपाययोजनांची मागणी