पुणे, २५ मार्च २०२५ ः नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) राजाराम पूल ते धायरी या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. एक एप्रिलपासून हा उड्डाणपूल खुला होईल असे सांगितले जात होते. पण आता अजून एक महिना लागणार आहे.
सिंहगड रस्त्यावरून प्रवास करताना नागरीकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल ते धायरी या मार्गावर सप्टेंबर २०२१ मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू केले. महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून डिसेंबर २०२५ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. संबंधित काम गतीने करण्यात येत आहे. आता पुलाचे काम ९० टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहे. विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख म्हणाले, “पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता रंगरंगोटी, पथदिवे व दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे. एक महिन्यात हे काम पूर्ण होईल.’

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन